
मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ३२१ भूखंड आहेत. त्यांतील २५५ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र त्यांतील केवळ २७ भूखंडांवर उद्योग चालू आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. यातून वाशिम येथील ३२१ पैकी २९४ भूखंडांवर उत्पादन होत नाही. हे भूखंड पडून आहेत, हा गंभीर प्रकार विधानसभेत उघड झाला. आमदार अमित झनक यांनी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी वाशिम जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाकडे असलेल्या भूखंडांची वरील स्थिती सभागृहात सांगितली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !