
‘संत थिरूमूलार यांनी ‘थिरूमंदिरम्’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका प्राचीन तमिळ ग्रंथात मनुष्याच्या जीवनात असलेले गुरूंचे महत्त्व वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘श्री गुरूंच्या दिव्य रूपाच्या दर्शनाने, श्री गुरूंच्या दैवी नामाचा जप केल्याने आणि श्री गुरूंची दिव्य वाणी ऐकल्याने मन शुद्ध होते; तसेच केवळ श्री गुरूंच्या रूपाचे चिंतन केल्यास मन शुद्ध होते.’ – थिरूमंदिरम्, श्लोक १३७

१. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून संपूर्ण देशभर राष्ट्ररक्षण आणि अध्यात्मप्रसार यांचे कार्य करत आहेत. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यांना (साधकांना) सिद्ध केले आहे.
२. ते संपूर्ण जगात सनातन हिंदु धर्माने सांगितलेल्या सात्त्विक जीवनशैलीचा प्रसार करत आहेत.

३. ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, यासाठी ते प्रयत्नशील असून त्यांचे हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी घडवलेले साधक अविश्रांत श्रम घेत आहेत. परात्पर गुरुदेवांच्या दैवी चैतन्यामुळे हिंदुत्वाचे कार्य संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात चालू आहे.
५. गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद यांमुळे मी गेल्या १० वर्षांपासून हिंदुत्वाचे कार्य करत आहे.
६. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मी कित्येक कठीण प्रसंगांतून बाहेर पडू शकलो आहे. एकदा काही गुंडांनी माझ्या घरावर पेट्रोल बाँब फेकला होता. केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच आमचे प्राण वाचले. अशा कित्येक दिव्य अनुभूती मला आल्या आहेत.’
– श्री. अर्जुन संपथ, संस्थापक-अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष), कोइम्बतूर, तमिळनाडू. (२५.४.२०२३)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !