सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

‘जीवामृत हे देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेले एक मिश्रण आहे. घरगुती लागवडीसाठी ५ लिटर जीवामृत करायचे असेल, तर अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी बेसन लागते. त्यांचे पर्याय खाली दिले आहेत.
१. बेसनाला पर्याय
येथे बेसन केवळ चणाडाळीचे अपेक्षित नसून मूग, तूर, मसूर, चवळी, अशा कुठल्याही द्विदल धान्याचे पीठ चालते. स्वयंपाकघरातील चांगले बेसन घेण्याऐवजी डाळी, कडधान्ये निवडतांना त्यांतील छिद्र पडलेली डाळ किंवा कडधान्य निवडून बाजूला काढून ते साठवून ठेवावे. मिक्सरवर दळून त्यांचे पीठ करता येते. हे पीठ जीवामृतासाठी वापरावे.
२. गुळाला पर्याय
गुळाऐवजी तेवढ्याच प्रमाणात गोड फळांचा गर घेतला, तरी चालतो. केळी, पपई, चिकू, आंबा, या गोड फळांचा गर काढून वापरावा. काही वेळा घरी आणलेली ही फळे अतिरिक्त प्रमाणात पिकतात अन् मऊ होतात. अशा वेळीही त्यांचा गर जीवामृत करण्यासाठी घ्यावा. ऊसाचा रससुद्धा वापरता येतो. तो गुळाच्या चौपट प्रमाणात घ्यावा, उदा. अर्धी वाटी गूळ असेल, तर २ वाट्या ऊसाचा रस घ्यावा.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (८.३.२०२३)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !