
कागल (जिल्हा कोल्हापूर) – वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच महापालिका प्रशासन अन् पर्यावरणवादी वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवाला प्रदूषणासाठी उत्तरदायी ठरवतात. अनेक ठिकाणी बलपूर्वक श्री गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. साखर कारखान्यांचे पाणी नदीत सोडल्याने सहस्रो मासे मृत झाल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत घडलेल्या आहेत. तरी प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता नदीच्या वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी कागल नगरपालिका प्रशासक टिना गवळी यांना दिले. या प्रसंगी सर्वश्री विजय आरेकर, जयसिंग टिकले, राजेंद्र साळुंखे, स्वप्नील माने, युवराज येजरे यांसह अन्य उपस्थित होते.
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत