
जालना – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे २३ ऑगस्ट या दिवशी अंबड गावाच्या दौर्यावर आहेत. अंबड शहरातून त्यांची दुचाकी वाहनातून फेरी निघणार आहे, तसेच शहरातील पंडित जळगावकर नाट्यगृहात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसचे काही कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अंबड शहरातील एका उपाहारगृहामधून काँग्रेसच्या १० कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना कह्यात घेताच त्यांनी दानवे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या कार्यकर्त्यांना अंबड पोलीस ठाण्यात नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. (कायदा हातात घेणारे कार्यकर्ते असणारी काँग्रेस कायदा-सुव्यवस्थेचे राज्य काय देणार ? – संपादक)
जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी बदनापूर येथील कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांड (गायीचा नर) असून ते कोणत्याच कामाचे नाहीत’ असे वक्तव्य केले होते, तसेच ‘लोकांनी निरुपयोगी म्हणून सोडलेली जनावरे कोणत्याच कामांसाठी चालत नाहीत, तसे राहुल गांधी असून ते पंतप्रधानपदासाठी निष्क्रीय आहेत’, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !