
कोल्हापूर – मुसळधार पावसामुळे राज्य मार्ग, जिल्हा मार्ग आणि महामार्ग येथे पुराचे पाणी असल्याने मागील ८ दिवस एस्.टी. बसची सेवा बंद होती. आता ४ मार्ग वगळता जिल्ह्यातील ३२ मार्गांवर एस्.टी. बससेवा चालू झाली आहे. यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर ४ दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनाही स्वत:च्या गावी सुखरूप पोचता आले आहे, अशी माहिती एस्.टी.च्या वाहतूक विभागाने दिली.
तालुका मार्गांवरील विविध गावांजवळ पुराचे पाणी आले. त्यामुळे जिल्ह्यात ४० मार्गांवरील एस्.टी. बसच्या फेर्या रहित कराव्या लागल्या. यामध्ये २२ आणि २३ जुलै या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गही बंद झाला होता. त्यामुळे मुंबई, पुणे, सोलापूर आणि सांगली येथे निघालेले अनेक प्रवासी येथे अडकले होते.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक