|

संभाजीनगर – नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत ११ जुलै या दिवशी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांतील रस्ते जलमय झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. औंढा नागनाथ तालुक्यातील असोला ते गोळेगाव मार्गावरील पुलावरून वहाणार्या पुराच्या पाण्यात एक चारचाकी वाहन वाहून गेले. या वाहनातील येथील रहिवासी योगेश पडोळ आणि रामदास शेळके यांना पोलीस तसेच गावकरी यांनी वाचवले, तर योगेश यांची पत्नी वर्षा अन् मुलगा श्रेयन हे दोघे वाहून गेले आहेत. या दोघांचा शोध चालू आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात कापरवाडी येथे मुसळधार पाऊस पडल्यामुळे साईनाथ लांडगे हा नाल्यात वाहून गेला, तर कंधार तालुक्यातील गणातांडा येथील शेतकरी दिनेश पवार आणि माहूर तालुक्यातील अंजनी येथील शेतकरी आकाश कुरसंगे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !