२६ जूनला भाजपचे राज्यभर चक्का जाम आंदोलन – आमदार जयकुमार गोरे

आमदार जयकुमार गोरे

सातारा, २२ जून (वार्ता.) – इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण रहित करण्यास सर्वस्वी सरकार उत्तरदायी आहे. असे केवळ महाराष्ट्रात झाले आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने २६ जून या दिवशी राज्यभर १ सहस्रांहून अधिक ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. ‘सत्तेत राहून ओबीसींविषयी कळवळा दाखवणार्‍या छगन भुजबळ यांनी आंदोलनाचे नाटक करण्याऐवजी सत्तेतून बाहेर पडावे’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

आमदार जयकुमार गोरे यांनी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. आमदार गोरे पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण रहित झाले आहे. याविषयी सरकार तांत्रिक माहिती पुरवू शकलेले नाही.