वणी (यवतमाळ) तालुक्यात आत्महत्या केलेल्या १२७ शेतकर्‍यांपैकी ३१ शेतकर्‍यांनाच शासकीय साहाय्य !

उर्वरित ९६ शेतकरी कुटुंबांना कोण साहाय्य करणार ?

वणी (यवतमाळ), २४ मे (वार्ता.) – तालुक्यात नापिकीने गत ६ वर्षांत १२७ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांपैकी १०३ जणांनी विषप्राशन केले, १९ जणांनी गळफास घेतला आणि बाकीच्यांनी पाण्यात बुडून आयुष्य संपवले; मात्र शासकीय साहाय्य ३१ जणांनाच मिळाले. (शासन-प्रशासनाचा भोंगळ कारभार ! – संपादक)