सातारा येथील घटना
समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !

सातारा, २२ मे (वार्ता.) – आईशी भांडण करून तिला मारहाण करणार्या ३५ वर्षीय युवकाची अविनाश मल्हारी सावंत यांनी हत्या केली आहे. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील दाते वस्तीवर ही घटना घडली असून हत्या करणार्यास फलटण पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
गणेश सावंत यांनी अविनाश मल्हारी सावंत यांना शेळीचे दूध काढण्यासाठी बोलवले; मात्र तो गेला नाही. या कारणावरून गणेश यांनी चिडून जाऊन अविनाश यांच्या आईशी भांडण करून तिला मारहाण केली. याचा राग मनात धरून अविनाश सावंत आणि त्यांचा एक सहकारी यांनी लोखंडी पाना आणि सत्तूर यांनी वार करून गणेश सावंत यांना जागेवरच ठार केले.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !