
१. लक्ष्मीपूजनाच्या रात्री मनातील अलक्ष्मी, म्हणजे नकारात्मकता, स्वभावदोष आणि अहं यांचे निवारण करण्यासाठी महालक्ष्मीदेवीला प्रार्थना केल्यावर तिने चैतन्याच्या कुंच्याने नकारात्मकता, स्वभावदोष अन् अहं सुपलीत घेऊन आश्रमाबाहेर नेऊन टाकणे आणि त्यानंतर मनाची सकारात्मकता वाढणे
‘मी लक्ष्मीपूजनाच्या रात्री बारा वाजता रामनाथी आश्रमातील तिसर्या माळ्यावरील मोकळ्या जागेतील बाकावर बसले होते. अकस्मात् देवाने मला विचार दिला, ‘आज अलक्ष्मी निःसारण करतात. माझ्या मनातील अलक्ष्मी, म्हणजे नकारात्मकता, स्वभावदोष आणि अहं यांचे निवारण करण्यासाठी महालक्ष्मीदेवीला प्रार्थना करूया.’ माझ्याकडून लक्ष्मीमातेला कळवळून प्रार्थना झाली आणि मला तिथे मोठ्या प्रमाणात प्रकाशझोत दिसला. मला दिव्य अलंकार आणि वस्त्रे परिधान केलेल्या महालक्ष्मीमातेचे दर्शन झाले. तिचे दिव्य रूप आणि मुखमंडल दिसले. तिच्या हातात चैतन्याचा कुंचा होता. तिने एका क्षणात माझे स्वभावदोष आणि अहं सुपलीत घेतले अन् आश्रमाबाहेर नेऊन टाकले. यानंतर माझ्या मनाची सकारात्मकता वाढली आणि स्वभावदोषांची विचारप्रक्रिया लक्षात येऊ लागली. ‘हे भगवंता, तू ही प्रक्रिया करून घेतलीस, यासाठी अनंत कोटी कृतज्ञता !’
२. भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येणे
१५.११.२०१८ या दिवशी माझा उजवा हात पुष्कळ दुखत होता. त्यामुळे मी लिहू शकत नव्हते. त्या दिवशी भाववृद्धी सत्संगात कु. वैष्णवी वेसणेकर हिने प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवण्याचा भावजागृतीचा प्रयोग घेतला. तेव्हा मला प.पू. गुरुदेवांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवू लागले. त्यांनी माझ्या दुखर्या हातावर दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवले. त्या क्षणी मला होणार्या वेदना थांबल्या. नंतर मला लिहिता येऊ लागले.
३. ‘आश्रमातील खोलीच्या आगाशीतून मोठ्या प्रमाणात केशरी-पिवळा प्रकाशझोत वरच्या दिशेने प्रक्षेपित होऊन संपूर्ण सृष्टीत पसरत आहे’, असे दिसणे, तेव्हा गुरुदेवांचे चैतन्य सर्वत्रच्या साधकांचे रात्रीही रक्षण करत असल्याचे लक्षात येणे
एकदा मला रात्री झोप येत नव्हती. त्यामुळे मी रात्री तिसर्या मजल्यावरील आगाशीत नामजप करत बसले होते. तेव्हा मला ‘दुसर्या आगाशीतून मोठ्या प्रमाणात केशरी-पिवळा प्रकाशझोत वरच्या दिशेने प्रक्षेपित होऊन संपूर्ण सृष्टीत पसरत आहे’, असे दिसले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. केवळ गुरुदेवांचे चैतन्यच या सृष्टीत सर्वत्रच्या साधकांचे रात्रीही रक्षण करत आहे’, हे माझ्या लक्षात आले.’
– सौ. राजश्री तिवारी, सोलापूर (४.१२.२०१८)
|
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !