मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसलो होतो. मी भावजागृतीसाठी प्रयत्न करत असतांना मनात कवितेचे शब्द येऊ लागले. माझ्या डोळ्यांसमोर श्रीकृष्णाचे मुखमंडल आले आणि माझी भावजागृती झाली. त्या वेळी मला सुचलेल्या काव्यपंक्ती पुढे दिल्या आहेत.


अंतरीचा भाव घेई मनाचा ठाव ।
या भावानेच जोडले जाते भगवंता तुझे नाव ॥ १ ॥
भावाच्या फुलांनी सजले मनाचे द्वार ।
नकारात्मक विचारांचा होई कमी भार ॥ २ ॥
भावातून सुचतात अनेक प्रार्थना ।
भगवंता, तुझ्याकडे लवकर येण्यासाठी होई याचना ॥ ३ ॥
भावातूनच अनुसंधान साधले जाते भगवंताचे ।
वाटते अनुसंधानात सतत भिजत रहायचे ॥ ४ ॥
भावातून साठतो मनात पाण्याचा झरा ।
भगवंताच्या आठवणीने डोळ्यांतून वाहू लागतात अश्रूंच्या धारा ॥ ५ ॥
भावातूनच भगवंता ओढ लागली तुझ्या प्राप्तीची ।
आणि लागली ओढ तुझ्या कोमल चरणांची ॥ ६ ॥
असाच प्रतिदिन भगवंता भावाचा झरा मनात साठू दे ।
भावाच्या साठ्यातून प्रत्येक क्षणी हे मन तुझ्याशी जोडले जाऊ दे ॥ ७ ॥
म्हणूनच भगवंता, अंतरीचा भाव घेई मनाचा ठाव ।
या भावानेच जोडले जाते भगवंता तुझे नाव ॥ ८ ॥
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०१९)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !