अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?

पुणे, ६ फेब्रुवारी (वार्ता. ) – एल्गार परिषदेचे व्यासपीठ वापरून धार्मिक तेढ निर्माण केली जाण्याची शक्यता होती. कारण देशाचे तुकडे करण्याची भाषा करणार्या अरुंधती रॉय, देशात हिंदूंनी बॉम्बस्फोट केले असे म्हणणारे मुश्रीफ एल्गार परिषदेच्या व्यासपीठावर होते. त्यातच शरजील उस्मानी याने हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे उस्मानी याच्यावरच नव्हे, तर एल्गार परिषदेचे आयोजन करणार्या बी.जी. कोळसे पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे.

या संदर्भातील निवेदन ३ फेब्रुवारी या दिवशी स्वारगेट पोलिसांना सादर केले आहे. कोळसे पाटील यांनी उस्मानी बोलला ते चूक आहे; मात्र त्याच्या एका वाक्यावरून गदारोळ करण्याची आवश्यकता काय ?, असे वक्तव्य केले होते. प्रतिवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार असेही कोळसे पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court