असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारकांनी आजपर्यंत दिलेल्या क्र्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो. स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीकारकांनी सशस्त्र आणि अत्याचारी राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.
वर्ष १९१९ मध्ये अमृतसर, पंजाब येथील जालियनवाला उद्यानात ब्रिटिशांच्या विरोधात असणार्या सभेला सहस्रो राष्ट्रप्रेमी एकत्र जमले होते. सभा चालू झाली आणि अचानक क्रूरकर्मा इंग्रज अधिकारी जनरल डायरने सैनिकांना गोळीबाराचे आदेश दिले. पटांगणाला चारही बाजूंनी भिंती होत्या. भारतियांनी अशा प्रकारे एकत्र येऊन क्रांती करू नये, या दुष्ट हेतूने डायरने २ सहस्र भारतियांचा भयंकर नरसंहार केला. या नरसंहाराच्या वेळेला ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबाराच्या खुणा जालियनवाला उद्यानातील भिंतीवर अजूनही आहेत. त्या वेळी अनेक राष्ट्रप्रेमींनी ब्रिटिशांच्या हातून मृत्यू येऊ नये; म्हणून बागेतील विहिरीत आत्महत्या केल्या.
जालियनवाला उद्यानातील रक्तरंजित इतिहासाचे
प्रत्येक भारतियाने स्मरण ठेवणे, ही काळाची नितांत आवश्यकता आहे !




अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !