आतापर्यंत राज्यातील ५ लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात आली ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया चालू आहे. ६५२ केंद्रांवर ही लस दिली जात आहे.

कटाच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी सैन्याने अनुमती दिली असल्याविषयी न्यायालयाने ले. कर्नल पुरोहित यांच्याकडे मागितले पुरावे

मालेगाव येथे बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीला सैन्याच्या आदेशावरून गुप्तवार्ता मिळवण्यासाठी उपस्थित असल्याची स्वत:ची बाजू कर्नल पुरोहित यांनी न्यायालयात मांडली आहे.

देहलीतील शेतकर्‍यांना चर्चा नाही, तर तमाशा करण्यातच रस ! – पाशा पटेल

सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला सिद्ध असतांना शेतकर्‍यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्‍न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.

आज कोल्हापुरात दुर्ग परिषद ! – सुखदेव गिरी

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडनंतर होणार्‍या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांविषयीची माहिती आदींविषयी ऊहापोह होणार आहे.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला करवसुलीसाठी पाठवलेल्या नोटिसीला स्थगिती

श्रीमंत, मध्यमवर्गीय किंवा सामाजिक संस्था कोणीही कर चुकवला तरी चूकच नव्हे का ?

आमदार-खासदारांच्या संस्थाच जिल्हा बँकेचे मोठे थकबाकीदार

जिल्हा बँकेची थकबाकी वाढतच असून आमदार-खासदारांच्या संस्थांकडे अनुमाने १ सहस्र कोटींची कर्जे आणि थकबाकी आहे. हा आकडा वाढत असतांना कारभार्‍यांनी वसुलीकडे कानाडोळा केला आहे.

कोरोना योद्ध्यांचे अपघाती विमा प्रस्ताव मनपा प्रशासनाने नाकारले

कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्‍या कर्मचार्‍यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन कर्मचार्‍यांचे प्रस्ताव नाकारणार्‍या प्रशासनाला कर्मचार्‍यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

सर्व शाळा-महाविद्यालयांत हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा विषय पोचवतो ! – शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे, जत

आपली महान भारतीय संस्कृती बाजूला ठेवून भारतीय अकारण पाश्‍चिमात्य संस्कृतीचे आचरण करत आहेत. तुमचा उपक्रम चांगला असून सर्व शाळा-महाविद्यालये येथे विषय पोचवतो, असे आश्‍वासन शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोरया गोसावींना दिली होती ९२ एकर इनामी भूमी !

छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ पत्रांतून ते साधू-संतांचा योग्य सन्मान करायचे, हे पुन्हा एकदा सिद्ध ! आजचे राजकारणी हिंदु संतांवर टीका-टिप्पणी करतात, शंकराचार्य यांच्यासारख्या हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना विनाकारण कारागृहात डांबतात !

माता-पित्यांना न सांभाळणार्‍या वाशिम जिल्हापरिषदेतील कर्मचार्‍यांना ३० टक्के रक्कम माता-पित्यांच्या खात्यांत जमा करावी लागणार !

वाशिम जिल्हा परिषदेने घेतलेला स्तुत्य निर्णय !