देशाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्व संप्रदायांनी एकत्र येऊन राष्ट्र बलशाली करणे, ही काळाची आवश्यकता !
दोन संतांमधील भेद हा देशकाल परत्वे असतो, तसेच साम्य असल्याची सूत्रे जशी महत्त्वाची असतात, तेवढी भेदाची सूत्रे महत्त्वपूर्ण नसतात. ‘दासबोध’ वाचतांना त्यात लपलेले संतश्रेष्ठ ज्ञानदेव दिसावेत आणि ‘ज्ञानेश्वरी’ वाचतांना त्यात दडलेले समर्थ रामदासस्वामी समजावेत. देहूच्या मंदिरात समर्थांचे दर्शन घडावे, तर सज्जनगडावरील समर्थ मंदिरात संत तुकाराम महाराजांचे दर्शन घडावे.