अरबी समुद्रातील तेल विहिरींचे काम करणार्‍या जहाजांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका !

चक्रीवादळ येणार असल्याची पूर्वसूचना दिलेली असतांनाही जहाज आस्थापनांनी वेळीच दक्षता का घेतली नाही ? जहाज बुडून कर्मचार्‍यांचे प्राण गेले, या जीवितहानीला उत्तरदायी कोण ?

‘आय.एन्.एस्. विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर आग लागली !

भारतीय नौदलाच्या आय.एन्.एस. विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर ८ मे या दिवशी सकाळी आग लागल्याची घटना घडली. युद्धनौकेच्या सेलर अ‍ॅकोमोडेशन कम्पार्टेमेंट म्हणजेच नौकेवर असणार्‍यांची रहाण्याची सोय असणार्‍या भागामध्ये ही आग लागली.

हिंदी महासागरातील व्यापार आणि जहाजांची सुरक्षा !

प्रतिदिन १३ ते १५ सहस्र जहाजे हिंदी महासागरामध्ये हालचाली करत असतात. भारताचे भौगोलिक स्थान अतिशय चांगल्या ठिकाणी आहे. भारताने सागरी किनारपट्ट्यांचे योग्य प्रकारे संरक्षण केले, तरच या भौगोलिक स्थितीचा आपल्याला लाभ होईल. त्यासाठी सागरी सुरक्षा अधिक विकसित करणे आवश्यक आहे.’ 

अरबी समुद्रातील नौकेतून ३ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

भारतीय नौदलाने अरबी दमुद्रात मासे पकडण्याच्या नौकेतून ३ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या नौकेतून अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.

अमली पदार्थांची तस्करी आणि तटरक्षक दलाचे यश !

चीन किंवा पाकिस्तान हे इतर देशांच्या साहाय्याने भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रे पाठवणार होते; परंतु या बोटी किनारपट्टीवर पोचण्यापूर्वीच पकडण्यात आल्या. त्यामुळे एक मोठा घातपात टळला.

अरबी समुद्रातील ‘एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन’मध्ये अमेरिकेच्या युद्धनौकेची घुसखोरी

भारताने अमेरिकेच्या या दादागिरीला भीक न घालता त्याला जाब विचारायला हवा ! भारताने चीन आणि पाक यांच्यासह आता अमेरिकेलाही धाकात ठेवायला हवे, हे यावरून लक्षात येते ! असा देश भारताचा कधीतरी मित्र राष्ट्र होऊ शकतो का ?

‘आयएन्एस् करंज’ ही पानबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाणारी ‘आयएन्एस् करंज’ ही अत्याधुनिक पाणबुडी १० मार्च या दिवशी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. मुंबई येथील पश्‍चिम कमांड नौदलाच्या मुख्यालयामध्ये नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमवीर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

चेन्नई येथून अपहरण केलेल्या नौसैनिकाला पालघर येथे जिवंत जाळले

यातील दोषींना सरकारने शोधून काढून तात्काळ फासावर लटकवले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !

ओडिशामध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या ५० व्या विजय दिनानिमित्त व्हाईस अ‍ॅडमिरल एस्.एच्. सरमा यांचा करण्यात आला सत्कार !

व्हाईस अ‍ॅडमिरल सरमा ९८ वर्षांचे असून त्यांची वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयामध्ये अविस्मरणीय आणि प्रमुख भूमिका आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सुजित’ गस्ती जहाजाचे लोकार्पण

या ‘ऑफ शोर’ गस्ती जहाजाचे ‘डिझाईन’, तसेच जहाजाची बांधणी ‘गोवा शिपयार्ड’ने केली आहे. जहाजात तंत्रज्ञान, ‘नेव्हीगेशन’, दळणवळण यंत्रणा, ‘सेन्सर’ आदी आधुनिक साधनसुविधा बसवण्यात आल्या आहेत.