देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या !

गुंडांना पोलिसांचा जराही वचक राहिला नसल्यानेच ते दिवसाढवळ्या कुणाचीही हत्या करू धजावतात ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे !

देहलीच्या तिहार कारागृहात बंदीवान गुंडांच्या टोळीयुद्धात एका गुंडाचा मृत्यू, तर ४ गुंड घायाळ

बाहेर गुंडगिरी करणार्‍यांना पकडून कारागृहात टाकल्यानंतरही ते तेथे अशाच प्रकारची कृत्ये करू शकत असतील, तर कारागृहातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती दयनीय आहे, हेच आपल्या लक्षात येते !

वेद आणि पुराणे यांचा अभ्यास केल्याचे वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार ! – विद्यापीठ अनुदान आयोग

विद्यार्थ्यांना वेद, पुराणे, मीमांसा, धर्मशास्त्र, ज्योतिष, वेदांग इत्यादी भारतीय ज्ञान परंपरांच्या विविध शाखांचा अभ्यास केल्यास वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार आहेत.

विदेशी अर्थपुरवठ्याच्या प्रकरणी ‘बीबीसी इंडिया’विरुद्ध गुन्हा नोंद !

ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या  (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती.

भारताने लेहमध्ये आयोजित केली जी-२० बैठक !

यंदाचे ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताला मिळाले असून पुढील जी २० परिषदेची बैठक लेहमध्ये आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये ८० देश सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून दर्जा रहित !

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून असलेला दर्जा रहित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करत नसल्याने हा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची कर्मचार्‍यांना मारहाण

देहलीहून लंडनला जाणार्‍या ‘एआय-१११’ विमानात एका प्रवाशाचा कर्मचार्‍याशी वाद झाला. प्रवाशाने कर्मचार्‍यांना मारहाण केली. यात २ कर्मचारी घायाळ झाले.

भाजप कव्वालीच्या माध्यमातून सरकारची कामे मुसलमानांपर्यंत पोचवणार !

भाजपने मुसलमानांना कितीही जवळ केले, तरी ते भाजपला मते देणार नाहीत. त्यामुळे भाजपने हिंदूंना जवळ करून त्यांचा विश्‍वास संपादन केल्यास हिंदू भाजपला भरघोस मतांनी निवडून देतील, हे निश्‍चित !

देशातील कारागृहांमधील ७७ टक्के बंदीवानांवरील खटले प्रलंबित !

आरोपींना अटक करून त्यांच्यावरील खटला प्रलंबित ठेवणे, हा आरोपी आणि फिर्यादी या दोघांवरील अन्याय आहे. ही स्थिती पालटण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !

वाणिज्य मंत्रालयाकडून हलाल प्रमाणित उत्पादनांसाठी दिशानिर्देश प्रसारित !

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हलाल उत्पादने प्रमाणित करून निर्यात करण्याच्या संदर्भात एक आदेश प्रसारित केला आहे. यानुसार हलाल प्रमाणित उत्पादनांसाठी भारतीय गुणवत्ता परिषदेच्या एखाद्या मंडळाच्या मान्यताप्राप्त शाखेकडून वैध प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असणार आहे.