‘आय.एम्.ए.’च्या अध्यक्षांची आव्हान याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम्.ए.चे) अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना कोणत्याही धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या संघटनेच्या मंचाचा वापर न करण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने नुकताच दिला होता.

युरोप, अमेरिका आणि चीन यांच्यामुळे जगाला हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ! – भारत

गेल्या २०० वर्षांत विशेषत: युरोप, अमेरिका यांनी, तर मागील ४० वर्षांत चीनने केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे; मात्र याच २०० वर्षांत हवामान पालटाच्या संकटात भारताचा वाटा ३ टक्के इतकाच आहे.

(म्हणे) ‘भारतात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर कलम ३७० वर पुनर्विचार करू !’

काँग्रेसला हिंदूंनी सत्ताच्युत का केले, याचे कोणतेही चिंतन काँग्रेसने केले नसल्यानेच तिचे नेते अशा प्रकारचे आश्‍वासन देऊन आत्मघात करत आहेत, हे लक्षात येते !

चिनी अ‍ॅप्सद्वारे २४ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या टोळीला अटक

भारत सरकारने आता चीनच्या प्रत्येक अ‍ॅपवर देशात बंदी घातली पाहिजे, हेच यावरून लक्षात येते !

मद्याचा पेला हातात घेतलेले भगवान शिवाचे ‘स्टिकर’ प्रसारित करणार्‍या इन्स्टाग्रामच्या विरोधात गुन्हा नोंद

मनीष सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे की, इन्स्टाग्रामने जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी अशा प्रकारचे चित्र प्रसारित केले आहे.

२१ जूनपासून केंद्र सरकार देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे विनामूल्य लसीकरण करणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

खासगी रुग्णालयांतही लस मिळणार आहे. तेथे केवळ लसीच्या मूल्यापेक्षा केवळ दीडशे रुपये अधिक रक्कम घेऊन ही उपलब्ध असणार आहे, असेही मोदी यांनी घोषित केले.

निवृत्तीच्या ४ वर्षांनंतर दोघा ब्रिगेडिअर्सना सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बढती !

अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्‍या सर्व अधिकार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

देहलीतील जी.बी. पंत रुग्णालयात परिचारिकांना मल्ल्याळम् भाषेत बोलण्यावर बंदी घालणारा आदेश रहित

देहलीतील विविध रुग्णालयांतील परिचारिकांनी याला संघटितपणे विरोध केल्याने हा आदेश अखेर मागे घ्यावा लागला.

देहली न्यायालयाची आय.एम्.ए.चे अध्यक्ष जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना तंबी !

जे न्यायालयाने सांगितले, ते आय.एम्.ए.च्या एकाही सदस्याने त्यांच्या अध्यक्षांना का सांगितले नाही ? कि त्यांना डॉ. जयलाल यांचे विधान मान्य होते ?

कन्नड भाषेविषयी अपशब्द वापरणार्‍या गूगलकडून क्षमायाचना !

गूगल ऑनलाइन ‘सर्च इंजिन’ने कन्नड भाषेला ‘भारतातील सर्वांत घाणेरडी भाषा’ असे म्हटले होते. कर्नाटक सरकारकडून विरोध झाल्यानंतर गूगलने भारतियांची क्षमा मागितली आहे.