५० टक्के सैनिक ४ वर्षांनंतर होऊ शकतात कायम !

नवी देहली – भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या तुकडीला भरती होऊन आता एक वर्ष झाले असून या योजनेत महत्त्वपूर्ण पालट केले जात आहेत, अशी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. ‘यांतर्गत या योजनेतून भरती झालेल्या तरुणांपैकी ५० टक्के तरुणांना कायम केले जाईल’, असे बोलले जात आहे. मूळ योजनेनुसार ही टक्केवारी केवळ २५ होती. तसेच उर्वरित ७५ टक्के तरुणांना एक विशिष्ट रक्कम देऊन निवृत्ती दिली जाणार होती. जर हा पालट कार्यान्वित झालाच, तर ५० टक्के तरुणांना कायम केले जाईल, तर उर्वरित ५० टक्क्यांना निवृत्ती दिली जाणार आहे.
Reportedly, the Agniveer scheme is likely to undergo changes.
50% Agniveers to be retained: SOURCES
Listen in as @Shivani703 joins @kritsween with more details on this. pic.twitter.com/znfDYaF2ox
— TIMES NOW (@TimesNow) July 9, 2023
१. ही योजना नौदल, हवाईदल आणि भूदल या तीनही दलांसाठी असून यासंदर्भात सरकारने सध्या अधिकृतपणे काहीही घोषित केलेले नाही. तरी यासंदर्भात संरक्षण विभागातील अधिकार्यांची पहिली बैठक झाली असल्याची माहिती आहे.
२. नौदल आणि हवाईदल यांमध्ये बहुतेक सैनिक हे तांत्रिक काम करत असतात. सैन्यातही सैनिकांना अनेक विभागांत तांत्रिक कामे करावी लागतात. त्यामुळे ५० टक्के भरती झालेल्या सैनिकांना कायमस्वरूपी करण्याच्या विचारात सरकार आहे.
३. पहिली तुकडी भरती होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे सरकार लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ
उत्तरप्रदेश : भगवान हनुमानाच्या मूर्ती तोडफोडीच्या प्रकरणी असद याच्यावर आरोप
५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis