
मुंबई, २३ जून (वार्ता.) – महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार समान नागरी कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानंतर महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा निर्णय घेतला जाईल. समान नागरी कायद्यासाठी शासन सकारात्मक आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी २३ जून या दिवशी विधानसभेत दिली.
भाजपच्या आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी ‘राज्यात तिहेरी तलाकसारख्या अनिष्ट प्रथांवर कडक कारवाई करावी’, याविषयी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देतांना राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात सांगितले, ‘‘समान नागरी कायदा हा सर्व धर्मियांसाठी असेल. याद्वारे मुसलमान धर्मातील बहुपत्नीत्व प्रथेवरही निर्बंध येतील.’’
५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
Ganga River Party : गंगा नदीत नौकेत मांस आणि मद्य यांची मेजवानी करण्याची घटना : ५ हिंदु तरुणांना अटक
New FCRA Rules : ‘धार्मिक कृती’च्या नावाखाली धर्मांतर करणार्यांच्या परदेशी देणग्यांवर केंद्र सरकारचा प्रहार
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
‘नीट’ परीक्षेमुळे विषमता निर्माण होत असल्याने इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश द्या ! – Tamil Nadu CM Vijay