
बदलापूर (ठाणे), २३ जून (वार्ता.) – शासनाच्या घरकुल योजनेच्या अंतर्गत संमत झालेल्या घरांचे बांधकाम चालू असतांना काही मुसलमानांनी मालकी हक्काचा दावा करत आदिवासी कुटुंबांच्या घरांच्या भिंती दोनदा पाडल्या. हा प्रकार बदलापूरजवळील मूळगाव परिसरात घडला. या घटनेमुळे आदिवासी कुटुंबे भयभीत झाली; मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर घराचे बांधकाम पुन्हा चालू करण्यात आले.
१. मूळगाव परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबे मागील ३ – ४ पिढ्यांपासून येथे वास्तव्यास आहेत. घरकुल योजनेतून त्यांना घरकुल संमत झाल्यानंतर संबंधित जागेवर बांधकाम चालू होते; मात्र ‘ही जागा आमच्या मालकीची आहे’, असा दावा शेजारी रहाणार्या मुसलमानांनी करत बांधकामास विरोध केला. त्यांनी उभारलेल्या भिंती पाडल्या.
२. त्रस्त झालेल्या आदिवासी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी वाद न घालता घडामोडींचे चित्रीकरण करण्याचा सल्ला देत बांधकाम चालू ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा मुसलमानांनी काम थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून काम चालू ठेवण्यास साहाय्य केले.
३. पोलिसांनी मुसलमानांकडे भूमी मालकीची कागदपत्रे मागितल्यावर ते ती देऊ शकले नाहीत. (अशा कायदाद्रोही मुसलमानांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक) २ वेळा बांधकाम पाडण्यात आल्याने आदिवासी कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ
उत्तरप्रदेश : भगवान हनुमानाच्या मूर्ती तोडफोडीच्या प्रकरणी असद याच्यावर आरोप
५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !
क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाचे हिंदु बसचालकावर आक्रमण !