नम्र, समाधानी आणि कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्‍साहन देणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) मिलिंद खरे (वय ६९ वर्षे) !

 ७.८.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील मिलिंद खरे यांचे निधन झाले. १८.८.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या कुटुंबियांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कर्करोगाला धीरोदात्तपणे सामोरे जाणार्‍या सनातनच्‍या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांचे निधन !

वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव या आयुर्वेदात एम्.डी. होत्‍या. त्‍या धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात साहाय्‍यक प्राध्‍यापिका म्‍हणून ५ वर्षांपासून कार्यरत होत्‍या.

प्रेमळ, स्‍थिर आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती कृतज्ञताभावात असणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त !

२१.७.२०२३ या दिवशी वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव साधकांना भेटण्‍यासाठी कोल्‍हापूर सेवाकेंद्रात आल्‍या होत्‍या. त्‍या वेळी सेवाकेंद्रातील सर्व साधकांना त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

देवाविषयी दृढ श्रद्धा आणि सूक्ष्मातून कळण्याची क्षमता असलेला पुणे येथील कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

अधिक श्रावण शुक्‍ल प्रतिपदा (१८ जुलै २०२३) या दिवशी सातारा रस्‍ता (पुणे) येथील बालसाधक कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याने ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी प्राप्‍त केल्‍याचे घोषित करण्‍यात आले.

सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (श्रीचित्‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांची लहान बहीण) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर त्यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘२०.१.२०२२ या दिवशी गुरुकृपेने माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला काहीच बोलता येत नव्हते. त्या दिवशी मला जाणवलेली सूत्रे मी गुरूंच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते.

चुकांविषयी गांभीर्य असलेला, कृतज्ञताभावात असणारा आणि ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेला बेळगाव येथील कु. हेरंब महेश गोजगेकर (वय ८ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. हेरंब महेश गोजगेकर हा या पिढीतील एक आहे !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. राधा सुनील दळवी (वय ८ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राधा सुनील दळवी ही या पिढीतील एक आहे ! ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली सातारा येथील कु. राधा दळवी (वय ८ वर्षे) ! सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला … Read more

बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

साधनेची तळमळ, संतांविषयी अपार भाव, आज्ञापालन करणे असे अनेक दैवी गुण लाभलेले मूळचे बेंगळुरू येथील उद्योगपती श्री. जयराम एस्. यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली असून ते जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यातून मुक्‍त झाले आहेत, असे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी एका सत्‍संगात घोषित केले.

ईश्वराप्रती भाव असणारे आणि निरपेक्षपणे धर्मकार्य करणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्याविषयी झालेला सूक्ष्मातील प्रयोग !

भजने ऐकतांना त्यांना भावाश्रू येतात. धर्मकार्यासाठी ते स्वत: व्यय करून विविध गावांमध्ये जाऊन हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करतात. त्यांचे कार्य निरपेक्ष असते.

कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सात्त्विकतेची आवड असलेली कु. धानी नायडू (वय ७ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

धानीचा जन्‍म झाला, तेव्‍हा तिच्‍या डोक्‍यावर पुष्‍कळ केस होते आणि तिला एक शेंडीही होती.