धर्मसंस्थापना आणि हिंदु राष्ट्र निर्मिती यांचे बीजारोपण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात, तसेच समाजातील अपप्रकार दूर करण्यासाठी व्यापक मोहिमा राबवून हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या दिशेने नेणारे समाजोद्धारक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी नवी पिढी सिद्ध करत असल्याविषयी कृतज्ञता !

आतापर्यंत २ बालक-संत आणि ६० टक्क्यांहून अधिक पातळीची २४४ आणि ९१६ अन्य दैवी बालके यांची समाजाला ओळख करून दिली आहे. प्रगल्भ बुद्धी आणि देवाची ओढ इत्यादी वैशिष्ट्ये असलेल्या दैवी बालकांच्या संदर्भात संशोधनकार्यही चालू आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी तन, मन, धन, बुद्धी आणि कौशल्य यांचे योगदान देणे, हीच काळानुसार गुरुदक्षिणा !

गुरुपौर्णिमेमध्ये ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता !’ या विषयावर केलेले मार्गदर्शन.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांना साधना करण्याचे महत्त्व पटवून देऊन साधना करण्यास प्रवृत्त करणे !

प.पू. डॉक्टरांना भेटायला काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख येतात. बहुतेकांत प्रखर राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राभिमान असतो. त्यांतील काही जण राष्ट्रासाठी प्राण अर्पण करण्यासही सिद्ध असतात; परंतु त्यांच्या कार्याला हवे तसे यश येत नाही.

‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेविषयी आश्वस्त करणारे एकमेवाद्वितीय द्रष्टे हिंदूसंघटक !

हे सर्वज्ञानी, सर्वव्यापी भगवंता, तूच कर्ता करविता असलेल्या या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आम्हाला सहभागी करून तुझ्या चरणांपर्यंत पोहोचण्याची संधी देत असल्याविषयी आम्ही अनंत कोटी कृतज्ञ आहोत !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गुरुभक्ती विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

अखंड कृतज्ञता…!

जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून कृतज्ञता व्यक्त करावी.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी त्वचेची ठेवण श्रीविष्णूच्या कपाळावरील टिळ्याप्रमाणे, म्हणजेच इंग्रजी भाषेतील ‘U’ या अक्षराप्रमाणे दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘श्रीविष्णूच्या अवतारांच्या दैवी देहांवर विविध प्रकारची शुभचिन्हे उमटतात. उदा. धर्मध्वज, सुदर्शनचक्र, शंख, धनुष्य, कमळ, गदा, इत्यादी. श्रीविष्णूच्या कपाळावरील इंग्रजी भाषेतील ‘U’ या अक्षराप्रमाणे दिसणारा चंदनाच्या टिळ्याचा आकार हेसुद्धा श्रीविष्णूचेच एक ‘शुभचिन्ह’ आहे.

कृतज्ञतेचे महत्त्व

‘कर्मफलन्याय सिद्धांत’ सर्वांना लागू असतो. कृतज्ञता व्यक्त केल्याने कर्मफलत्याग होतो आणि कर्म अकर्म होते आणि देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही. त्यामुळे साधक जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता न्यून होते.

‘कोटी कोटी कृतज्ञता’ असे का म्हटले जाते ?

आपल्या प्रतिदिनच्या जगण्यातील, तसेच आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना; किंबहुना प्रत्येकच गोष्टीविषयी कोटी कोटी म्हणजे अनंत कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती न्यूनच पडेल; म्हणून तर ‘कोटी कोटी कृतज्ञता’ असा शब्द वापरला जातो !