मुंबईमध्ये मराठीत पाटी न लावणार्‍या दुकानांना दुप्पट मालमत्ता कर आकारला जाणार !

मराठी भाषेत नामफलक न लावणार्‍या दुकानांनी तात्काळ मराठी भाषेत फलक लावावेत. याचे पालन न करणारी दुकाने आणि आस्थापने यांवर यापुढे कठोर कारवाई करावी लागेल.

हिंदु राष्ट्र नको, रामराज्य हवे !

पहिल्या टप्प्यात देशात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, पुढे त्याचे रामराज्याच रूपांतर करायचे आहे ! त्यामुळे साक्षी महाराजांनी प्रथम देशात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावा

(म्हणे) ‘बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (‘एन्.आर्.सी.’) लागू केल्यास संपूर्ण भारत पेटेल ! – लष्कर-ए-तोयबा

अशा प्रकारची धमकी आतंकवादी संघटनेच्या नावाने अन्य कुणी देत आहे का ? याची आधी चौकशी करणे आवश्यक आहे !

US WarShip Repairing In India : भारताच्या ‘कोचिन शिपयार्ड’वर अमेरिकेच्या युद्धनौकांची होणार दुरुस्ती !

या ताज्या करारानंतर आता भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम दोन्ही किनारपट्ट्यांवर अमेरिकी युद्धनौकांची सहज दुरुस्ती करता येणार आहे. अमेरिकेने या शिपयार्डची चौकशी करून सर्वेक्षण केले आणि त्यानंतर आता या कराराला मान्यता दिली आहे.

हिमाचल प्रदेशात ईदच्या दिवशी मुसलमान महिलांसाठी बस प्रवास विनामूल्य !

हिंदूंच्या सणांच्या वेळी कधी हिंदु महिलांना अशी सुविधा का देण्यात येत नाही ? पाकिस्तानातच नव्हे, तर कुठल्याच इस्लामी देशात अशा प्रकारची सुविधा दिली जात नाही; मात्र भारतात जेथे काँग्रेसचे सरकार आहे, तेथे मुसलमानांना त्यांच्या धर्माचे आधारे विविधा सुविधा पुरवल्या जातात, हे लक्षात घ्या !

उत्तराखंडमध्ये बाबा तरसेम सिंह यांची हत्या करणारा पोलीस चकमकीत ठार !

राज्यातील उधमसिंह नगरमधील नानकमट्टा गुरुद्वाराचे कारसेवा प्रमुख बाबा तरसेम सिंह यांच्या हत्येचा आरोपी अमरजीत सिंह हा येथे झालेल्या चकमकीत ठार झाला.

उरुळी कांचनजवळील (पुणे) भवरापूर येथे ‘अंनिस’चा ‘स्मशान भेट’ कार्यक्रम !

भूते पहाण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. सूक्ष्म ज्ञानेंद्रिय साधना करूनच जागृत होतात, हे नास्तिकतावाद्यांना केव्हा समजणार ? असे हास्यास्पद उपक्रम राबवून नास्तिकतावादी स्वतःचेच हसे करून घेत आहेत !

काश्मीरच्या सूत्रावर पाकिस्तानने भारताशी चर्चा करावी ! – सौदी अरेबिया

‘जोपर्यंत पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत भारत पाकसमवेत कोणतीही चर्चा करणार नाही’, असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले असल्याने अशी चर्चा कधीही होऊ शकणार नाही, ही वस्तूस्थिती आहे.

दोन्ही देशांनी चर्चा करून तोडगा काढावा ! – अमेरिका

अलीकडच्या काळात भारताचे अनेक शत्रू परदेशी भूमीवर मारले गेले आहेत. पाकिस्तानमध्येही भारताच्या शत्रूंच्या हत्या झाल्या आहेत. पाकिस्तानने भारतावर हा आरोप केला आहे; मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई !

पोलीस प्रशासनाने एकूण ४० हिंदु कार्यकर्त्यांवर कारवाईची सिद्धता केली होती. ही गोष्ट विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांना समजल्यावर त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांना तात्पुरते नमते घ्यावे लागले.