हिंदु राष्ट्र नको, रामराज्य हवे !

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचे विधान !

उन्नाव (उत्तरप्रदेश) – हिंदु राष्ट्रही अनेक जुलमी राजांचे होते. कंसाचेही हिंदु राष्ट्र होते. हिंदु राष्ट्र नाही, तर रामराज्य हवे आहे. खूप विचार केल्यावर मला हे समजले, असे विधान भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. ते भाजपकडून येथे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

साक्षी महाराज पुढे म्हणाले की, २२ जानेवारीला रामराज्याची स्थापना झाली आहे. आता हिंदु राष्ट्राला काही अर्थ नाही. रामराज्यात सर्वांना समान अधिकार आहेत. नरेंद्र मोदी ही व्यक्ती नाही, तर ते अवतारी पुरुष आहेत. आम्ही धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आलो आहोत. मोदी हे भगवंताचे अवतार आहेत. जोपर्यंत मोदीजींचे शरीर आहे, तोपर्यंत मोदीजींना जे हवे ते भारतात होईल.

संपादकीय भूमिका

पहिल्या टप्प्यात देशात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, पुढे त्याचे रामराज्याच रूपांतर करायचे आहे ! त्यामुळे साक्षी महाराजांनी प्रथम देशात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावा, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !