कल्याण येथे खड्डे चुकवतांना दुचाकीस्वाराचा मृत्यू !
आणखी किती जणांचे मृत्यू झाल्यावर प्रशासन आणि सरकार ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ करणार आहे ?
आणखी किती जणांचे मृत्यू झाल्यावर प्रशासन आणि सरकार ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ करणार आहे ?
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसचालकांनी बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.
बृहन्मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २९ जुलै २०२३ पर्यंत पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करून ध्वनीवर्धकाचा वापर करणे, फटाके फोडणे यास आदेशानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे.
जैन समाजाचे तपस्वी गुरुदेव आचार्य श्री कामकुमारनंदीजी महाराज यांच्या कर्नाटकातील आश्रमात घुसून समाजकंटकांनी त्यांची हत्या केली होती, तसेच त्यांच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करून ‘बोअरवेल’मध्ये फेकले.
शिक्षण विभाग पुणे उपसंचालक कार्यालय आणि सोलापूर जिल्हापरिषद शिक्षणाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. चौकशी समिती नेमून येथील शिक्षणाधिकार्यांची चौकशी करणार का ?
‘मगरपट्टा सिटी’तील चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन करणार्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या पतीने तिघांना खडसावले. तेव्हा आरोपींनी पतीला शिवीगाळ करून धमकावले. या प्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पसार झालेले महंमद आदिल, अफजल अली आणि अन्य एकाला अटक करण्यात आली आहे.
ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टला १९ जुलै या दिवशी टाळे ठोकले. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित साई रिसॉर्टच्या बांधकामात ‘सी.आर्.झेड.’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.
चिपळूण आणि खेड येथील पावसाचा जोर न्यून होताच येथील पूर ओसरल्यामुले विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्ववत् होत आहे. कुंभार्ली आणि आता परशुराम घाटातून दुहेरी वाहतूक चालू करण्यात आली आहे.
दरड प्रवण गावांवर विशेषत: डोंगराच्या पायथ्याशी असणार्या गावांवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने लक्ष द्या. ग्रामस्थांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिल्या.
पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर मार्ग जाण्या-येण्यासाठी धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून मानवी जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून खोपी-शिरगाव येथील रघुवीर घाट ३१ जुलैपर्यंत पर्यटकांकरता बंद करण्यात येत आहे, असा आदेश खेड उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी दिला.