ओवैसी यांनी लिहून दिल्यास रोहिग्यांना बाहेर हाकलू ! – अमित शहा यांचे प्रत्युत्तर

‘जर हैद्राबादमध्ये अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्या रहात आहेत, तर अमित शहा कारवाई का करत नाही ?’, असा प्रश्‍न ओवैसी यांनी विचारला होता. त्याला शहा यांनी उत्तर दिले.

कुजलेल्या कांद्याऐवजी चांगला कांदा देण्याविषयी नाफेड संस्थेशी शासनाची बोलणी !   गोविंद गावडे, नागरीपुरवठा मंत्री

कुजलेला कांदा परत घ्यावा किंवा त्याच्या बदल्यात चांगला कांदा गोव्याला पुरवावा, याविषयी गोवा शासन ‘नाफेड’ या संस्थेशी बोलणी करत आहे, असे नागरीपुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे आणखी २ मृत्यू

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४४ झाली आहे.

गोव्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू होणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू करण्याची आवश्यकता नाही. मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी न करणे इत्यादी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून गोव्यातील लोक कोरोनाचा पराभव करू शकतात.’’

देहलीत शिवशक्ती मंदिरातील १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

कीर्तनातून भारतीय संस्कृतीचे जतन होते !  सुभाष शिरोडकर

याप्रसंगी सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘कीर्तनामुळे संस्कार मिळतात. भगवद्गीता, स्तोत्रे मुखात येतात. यामुळे समाजात एकता निर्माण होते; म्हणून आज तरुण मुलामुलींनी कीर्तनाचे प्रशिक्षण घ्यावे. ही काळाची आवश्यकता आहे.’’

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात धर्मांधाने बळजोरीने टिपू सुलतानची प्रतिमा लावली !

उद्दाम धर्मांध ! शासकीय कार्यालयात क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या प्रतिमेची काय आवश्यकता ?

विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांकडून तळोजा (जिल्हा रायगड) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पोलीस आयुक्तांनी या गंभीर आरोपांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे !

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात नाशिक येथील सैनिक नितीन भालेराव हुतात्मा

छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात येथील  सी.आर्.पी.एफ्.चे जवान नितीन भालेराव हुतात्मा झाले आहेत. रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले.

पंतप्रधान मोदी पुण्यात आल्यावर संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी घोषणा देणारे ३ तरुण पोलिसांच्या कह्यात

कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी २८ नोव्हेंबर या दिवशी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतून संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेच्या घोषणा देण्यात आल्या.