विश्‍वविख्यात चन्नकेशव देवालयाच्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण करण्याची प्रथा बंद !

काही वर्षांपासून रथासमोर कुरान पठण केल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ होण्याची कुप्रथा पडली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून अंदोलन केल्यावर राज्य धर्मादाय विभागाने ‘देवालयाच्या रथासमोर कुराण पठण करता येणार नाही’, असे सांगितले.

गडहिंग्लज शहरासाठी ४६ कोटी ६० लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना संमत !

भारत सरकारपुरस्कृत ‘अमृत मिशन २’अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘हर घर नल, हर घर जल’ या धोरणानुसार गडहिंग्लज शहरासाठी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने ४६ कोटी ६० लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना संमत केली आहे.

शासकीय उच्च कला परीक्षेवर कला महाविद्यालय महाराष्ट्र संघाचा बहिष्कार !

राज्यातील कला महाविद्यालय महाराष्ट्र संघाच्या वतीने उच्च कला अभ्यासक्रम, अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या विनाअनुदानित चित्रकला संस्था, प्रवेश प्रक्रिया अशा विषयांशी निगडित विविध मागण्या सातत्याने करण्यात येत आहेत

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून ९ मासांत ६ सहस्र २०० जणांना अर्थसाहाय्य !

नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ९ मासांत राज्यातील ६ सहस्र २०० नागरिकांना ५० कोटी ५५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

शिरगाव (पुणे) येथील सरपंचांचा कोयत्याने वार करून खून !

भूमीच्या वादातून ही घटना घडली आहे. प्रवीण गोपाळे हे विद्यमान सरपंच म्हणून काही दिवसांपूर्वीच निवडून आले होते.

वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे मलब्याचा ढिगारा ढासळल्याने ३ कामगारांचा मृत्यू !

जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील झोलेगाव शिवारात विहिरीचे काम चालू असतांना विहिरीलगत असलेला मलब्याचा ढिगारा ढासळल्याने त्याखाली दबून ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे

साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी धीरेंद्रशास्त्री यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला नाही. जबलपूर येथे एका भाविकांनी साईबाबा यांची पूजा केली पाहिजे कि नाही ?

एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त !

राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

सोलापूर शहरातील पाणीपुरवठा किमान ३ दिवसाआड करण्याचा प्रयत्न ! – संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त

सध्या शहरात ४ ते ५ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काही मासांमध्ये शहरात किमान ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असेल. शहराची लोकसंख्या वाढली असल्याने २६ नवीन पाण्याच्या टाक्या बसवण्याचे नियोजन आहे.

पुण्यातील बडी दर्ग्याजवळ नारायणेश्‍वर मंदिराचे अवशेष सापडले !

नारायणेश्‍वर मंदिर तोडून तेथे दर्गा बांधल्याचे हिंदू सांगत होते. या अवशेषांमुळे त्याला पुष्टी मिळाली आहे. या सर्व अवशेषांचा तात्काळ अभ्यास करून बडी दर्ग्याचे सत्य समाजासमोर आणणे आवश्यक !