प्रयागराज कुंभपर्व २०२५
महाकुंभाच्या समारोपानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाविकांना आवाहन !

नवी देहली – एकतेचा महान यज्ञ पूर्ण झाला. जेव्हा एखाद्या राष्ट्राची जाणीव जागृत होते, जेव्हा ते शतकानुशतके गुलामगिरीच्या मानसिकतेच्या सर्व बेड्या तोडून नवीन चेतनेने श्वास घेऊ लागते. महाकुंभात हेच दिसून आले. एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणे सोपे नव्हते. मी गंगा, यमुना आणि सरस्वती मातेला प्रार्थना करतो की, जर आमच्या उपासनेत काही कमतरता असेल, तर कृपया आम्हाला क्षमा करा. जर आम्ही भक्तांची सेवा करण्यात न्यून पडलो असलो, तर मी जनतेची क्षमा मागतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ यशस्वीपणे पार पाडल्यानंतर ‘ब्लॉग’ लिहून त्यांचे विचार मांडले. ‘एकतेचा महाकुंभ : युग परिवर्तनाची चाहुल’ या मथळ्याखाली त्यांनी त्यांचे विचार यात मांडले.
महाकुंभ संपन्न हुआ…एकता का महायज्ञ संपन्न हुआ। प्रयागराज में एकता के महाकुंभ में पूरे 45 दिनों तक जिस प्रकार 140 करोड़ देशवासियों की आस्था एक साथ, एक समय में इस एक पर्व से आकर जुड़ी, वो अभिभूत करता है! महाकुंभ के पूर्ण होने पर जो विचार मन में आए, उन्हें मैंने कलमबद्ध करने का… pic.twitter.com/TgzdUuzuGI
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2025
पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेले विचार
१. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार, प्रशासन आणि जनता यांनी एकत्रितपणे एकतेचा हा महान कुंभ यशस्वी केला. केंद्र असो वा राज्य, कुणीही शासक किंवा प्रशासक नव्हता, प्रत्येकजण भक्तीने भरलेला सेवक होता.
If there were any shortcomings in the Mahakumbh arrangements, we humbly seek your forgiveness.
– PM Modi’s heartfelt appeal to devotees after #Mahakumbh2025 concludesमहाकुंभ l प्रयागराज@news24tvchannel pic.twitter.com/WJKpjZ31p3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 28, 2025
२. जर आपण स्वातंत्र्यानंतर भारताच्या या शक्तीचे अफाट स्वरूप ओळखले असते, आणि ही शक्ती सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या आनंदासाठी वळवली असती, तर गुलामगिरीच्या परिणामातून बाहेर पडून ती भारतासाठी एक महान शक्ती बनली असती; परंतु तेव्हा आपण हे करू शकलो नाही.
![]() |
३. हा महाकुंभ कार्यक्रम आधुनिक काळातील व्यवस्थापन व्यावसायिक, नियोजन आणि धोरण तज्ञांसाठी अभ्यासाचा एक नवीन विषय बनला आहे. आज संपूर्ण जगात इतक्या मोठ्या घटनेची तुलना होऊ शकत नाही. यासारखे दुसरे उदाहरण नाही.
४. त्रिवेणी संगमात एकाच नदीकाठी कोटींच्या संख्येने लोक कसे जमले हे पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. या कोट्यवधी लोकांना ना औपचारिक निमंत्रण होते ना त्यांना कधी पोचायचे, याची कोणतीही पूर्व माहिती होती. मग लोक महाकुंभाकडे निघाले आणि पवित्र संगमावर स्नान करून त्यांनी आशीर्वाद घेतला.
५. या महाकुंभात सहभागी होण्यासाठी भारतातील तरुणांचे पुढे येणे हा एक मोठा संदेश आहे. यावरून हे सिद्ध होते की, भारताची तरुण पिढी ही आपल्या परंपरा आणि संस्कृती यांची वाहक आहे. तिला ते पुढे नेणे, हे स्वतःचे दायित्व वाटते. ते यासाठी दृढनिश्चयी आणि समर्पित आहेत.
६. जर आध्यात्मिक क्षेत्रात संशोधन करणार्या लोकांनी कोट्यवधी भारतियांच्या या उत्साहाचा अभ्यास केला, तर त्यांना आढळेल की, आपल्या वारशाचा अभिमान असलेला भारत आता एका नवीन उर्जेने पुढे जात आहे. मला वाटते, हा त्या युगातील पालटाचा आवाज आहे, जो भारतासाठी एक नवीन भविष्य लिहिणार आहे.
७. ज्याप्रमाणे एकतेच्या महाकुंभात, प्रत्येक भक्त, मग तो गरीब असो वा श्रीमंत, मूल असो वा वृद्ध, देश असो वा परदेश … गाव असो वा शहरातील, कोणत्याही जातीचा, कोणत्याही विचारसरणीचा, सर्व जण एकाच महायज्ञासाठी एकतेच्या महाकुंभात एकत्र आले. ‘एक भारत, महान भारता’चे हे अविस्मरणीय दृश्य कोट्यवधी देशवासियांमध्ये आत्मविश्वासाचा एक भव्य उत्सव बनला. आता अशा प्रकारे आपल्याला विकसित भारताच्या महान कार्यासाठी एकत्र यावे लागेल आणि एकत्र यावे लागेल.