Coaching Jihad : देहलीतील कोचिंग सेंटरमधील मुसलमान शिक्षकाकडून हिंदु विद्यार्थ्‍यांना कुराण वाचण्‍यासाठी दबाव !

  • देहलीत आता ‘कोचिंग जिहाद’ !

  • पालकांकडून पोलिसांत तक्रार !

नवी देहली – येथील शकूरपूर परिसरातील जे.एम्.डी. कोचिंग सेंटरमध्‍ये मुसलमान शिक्षक रिझवान हिंदु विद्यार्थ्‍यांचा बुद्धीभेद करत देवाची पूजा करायचे सोडून अल्लाची पूजा करण्‍यास आणि कुराण वाचण्‍यास सांगत होता. येथे शिकणार्‍या एका विद्यार्थ्‍याच्‍या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे.

या तक्रारीत म्‍हटले आहे की, माझा मुलगा जे.एम्.डी. कोचिंग सेंटरमध्‍ये शिकतोे आणि गेल्‍या अनेक दिवसांपासून तो मला कुराणाविषयी विचारत होता. आधी मी त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष केले; मात्र मुलाने सांगितले की, त्‍याचे शिक्षक रिजवान त्‍याला वारंवार कुराण वाचण्‍यास सांगत होते आणि ‘कलमा’ (अल्लाचा गौरव करणारी विधाने)  वाचण्‍यासाठी वारंवार दबाव आणत होते. सेंटरमधील शिक्षकांनी मुलांना सांगितले की, ‘तुमचा हिंदु धर्म मूर्खपणाचा आहे. तुमच्‍या देवतांमध्‍ये शक्‍ती नाही. त्‍यामुळे आतापासून कुराण आणि कलमा वाचावे लागतील. त्‍यात पुष्‍कळ शक्‍ती आहे. त्‍यामुळे तुम्‍ही बलवान व्‍हाल.’ याविषयी रिझवान यांच्‍याशी दूरभाषवरून संपर्क करून विचारणा केल्‍यावर त्‍याने शिवीगाळ केली. तो म्‍हणाला की, मी दाऊद इब्राहिमचा बाप आहे. मी तुमच्‍या संपूर्ण कुटुंबाला नग्‍न करून नाचायला लावेन.

‘जय माता दी’ कोचिंग सेंटरमध्‍ये मुसलमान शिक्षक !

याप्रकरणी ‘स्‍वराज्‍य’ नियतकालिकाच्‍या संपादिका स्‍वाती गोयल शर्मा यांनी पोस्‍ट करत म्‍हटले आहे की, मी मुलांच्‍या वडिलांशी बोलले. सत्‍य हे आहे की, ज्‍या कोचिंग सेंटरमध्‍ये अल्‍पवयीन हिंदु मुलांचे इस्‍लाममध्‍ये धर्मांतर केले जात आहे, त्‍याचे नाव ‘जय माता दी’ आहे आणि त्‍याच्‍या फलकावर ‘जे.एम्.डी. लिहिले आहे. मुलाच्‍या वडिलांचे म्‍हणणे आहे की, जेव्‍हा त्‍यांनी मुलांना प्रवेश दिला, तेव्‍हा त्‍यांचे संजय नावाच्‍या व्‍यक्‍तीशी बोलणे झाले. रिजवान आणि अबरार या नावाचे शिक्षक शिकवणीला येतील आणि मुलांना धर्मांतर करण्‍यास भाग पाडतील, हे त्‍या वेळी वडिलांना ठाऊक नव्‍हते.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनो, तुमच्‍या मुलांना कोण आणि काय शिकवत आहे, याची माहिती घ्‍या ! कोचिंग सेंटरच्‍या नावाखाली तुमच्‍या मुलांना धर्मांतरित करण्‍याचा प्रयत्न करणार्‍यांना उघड करा !
  • मुसलमान कितीही शिकले, तरी ते त्‍यांच्‍या धर्माचाच विचार करतात, तर हिंदु कितीही शिकले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहून अन्‍य धर्मियांना महान समजतात !