आजवर आपत्काळ पुढे ढकलला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे, थोर संत-महात्मे यांची कृपा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पृथ्वीवर रज-तम यांचे प्रमाण कमाल (सर्वाेच्च) झाले की, आपत्काळ येतो. हा नैसर्गिक आपत्ती, युद्ध अशा विविध माध्यमांतून दिसून येतो. या आपत्काळामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असते. सध्या येणार्‍या आपत्काळाची भीषणता इतकी असेल की, काही संतांनीही म्हटले आहे की, ‘या आपत्काळात आम्हालाही डोळे बंद करून घ्यावे लागतील.’ सर्वसामान्य व्यक्तींना या भीषण आपत्काळाला सामोरे जाणे अशक्य असेल. त्यामुळे आजवर अनेक वेळा थोर संत-महात्मे यांनी सर्वसामान्य जिवांचा विचार करून स्वतःची साधना खर्च करून हा आपत्काळ पुढे ढकलला आहे. सर्वसामान्य जिवांनी साधना वाढवली, तरच त्यांना हा आपत्काळ सुसह्य होऊ शकेल !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.