आचार्य चाणक्‍यांप्रमाणे हिंदूसंघटन करणे, हाच हिंदूंच्‍या सर्व समस्‍यांवरील उपाय !

हिंदु राष्‍ट्र साकारायचे असेल, तर हिंदु धर्मबांधवांवरील अन्‍यायाचे चित्र सदैव तेवत ठेवले पाहिजे. सध्‍याच्‍या सर्व समस्‍यांवरील उपाय म्‍हणून आज हिंदु राष्‍ट्रासाठी आंदोलन करायला हवे. हे आंदोलन पूर्णत्‍वाला घेऊन जाण्‍यासाठी आपल्‍याला हिंदूंचे संघटन हवे. आचार्य चाणक्‍यांनी देशातील शत्रूचा समाचार प्रथम घेतला नाही. सर्वप्रथम तेे तक्षशीला येथे गेले आणि त्‍यांनी अनेक छोट्या-छोट्या राजांना संघटित केले.

– श्री. विनोदकुमार यादव, उत्तर बिहार प्रांत संयोजक, हिंदु जागरण मंच, वैशाली, बिहार.