(म्‍हणे) ‘सत्ताधारी पक्ष अशा घटनांना प्रोत्‍साहित करतो !’

शरद पवार यांचे धर्मांधांना पाठीशी घालणारे विधान !

शरद पवार

कोल्‍हापूर – कुणीतरी भ्रमणभाषवर काहीतरी संदेश पाठवला. तो चुकीचा असेल; पण त्‍यासाठी रस्‍त्‍यावर उतरून त्‍याला धार्मिक स्‍वरूप देणे, हे योग्‍य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्‍साहित करतो, अशी टीका शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्‍या सरकारवर केली. (औरंगजेब, टिपू सुलतान यांची चित्रे आणि तेही शिवराज्‍याभिषेकदिनी ‘स्‍टेटस’ला ठेवली जातात, या घटनेचे गांभीर्य पवार यांना लक्षात येत नाही, यात आश्‍चर्य ते काय ? केवळ धर्मांधांचे लांगूलचालन करण्‍यात ज्‍यांची हयात गेली, त्‍यांची स्‍थिती वेगळी काय असणार ? – संपादक) ते पुढे म्‍हणाले की, राज्‍य सरकारचे दायित्‍व राज्‍यात शांतता प्रस्‍थापित करण्‍याचे असते; मात्र शासनकर्तेच रस्‍त्‍यावर उतरायला लागले असून त्‍यातून २ समाजांत जातीय आणि धार्मिक कटुता निर्माण व्‍हायला लागली, तर ते चांगले लक्षण नाही. (धार्मिक कटुता कोण निर्माण करते, हे स्‍पष्‍ट असतांना त्‍यांना पवार का समजावत नाहीत ? – संपादक) हे सगळे घडवले जात आहे. औरंगजेबाचे चित्र दाखवले, तर त्‍यासाठी पुण्‍यात दंगल आणि आंदोलन करण्‍याचे काय कारण आहे ?