
चिकबळ्ळापूरा (कर्नाटक) – लोकसंख्या वाढवण्याचे काम जनावरेही करतात. केवळ जिवंत रहाणे, हाच जीवनाचा उद्देश नसावा. माणसाची इतरही अनेक कर्तव्ये आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते कर्नाटकातील चिकबळ्ळापूरा जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळीमध्ये सत्य साईं ग्राम येथे ‘श्री सत्य साई युनिव्हर्सिटी फॉर ह्यूमन एक्सिलन्स’च्या पहिल्या दीक्षांत समारंभात बोलत होते. जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वांत कमकुवत प्राणी बनला असता, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. भागवत पुढे म्हणाले की, जर १०-१२ वर्षांपूर्वी कुणी म्हणाले असते की, ‘भारत मोठी प्रगती करेल’, तर आपण ते गांभीर्याने घेतले नसते. राष्ट्राची प्रक्रिया एकाएकी चालू झालेली नाही, ती वर्ष १८५७ पासून चालू आहे, जी स्वामी विवेकानंद यांनी पुढे नेली. आध्यात्मिक साधनांच्या माध्यमांद्वारे उत्कृष्टता प्राप्त केली जाऊ शकते; कारण विज्ञानाला अद्याप सृष्टीचा उगम समजलेला नाही.
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Madan Mitra : तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी फेकली अंडी
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !