
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना २४ ऑगस्टच्या मध्यरात्री महाड येथील विशेष दंडाधिकार्यांनी १५ सहस्र जातमुचलक्यावर जामीन संमत केला. नारायण राणे यांना ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत रायगड गुन्हे शाखेत उपस्थित रहावे लागणार आहे. जामिनावर सुटका करतांना राणे यांना कागदपत्रे आणि पुरावे यांमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येणार नाही, असे दंडाधिकार्यांनी निर्देश दिले आहेत.
राणे यांची मध्यरात्री सुटका झाली, त्या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. रत्नागिरी पोलिसांनी २४ ऑगस्टला दुपारी राणे यांना संगमेश्वर येथे अटक केली होती. त्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांना रायगड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले होते. राणे यांच्या अटकेमुळे शिवसेना आणि भाजप यांमध्ये राज्यात ठिकठिकाणी संघर्ष पेटला असून त्याचे पडसाद अजूनही राज्यात उमटत आहेत.
२६ ऑगस्टपासून रत्नागिरी येथून नारायण राणे पुन्हा जनआशीर्वाद यात्रा चालू करतील ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
नारायण राणे आता मुंबईला जाणार आहेत. तेथे त्यांच्या प्रकृतीची पडताळी केली जाणार आहे. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते २६ ऑगस्टपासून रत्नागिरीमधून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा चालू करतील
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !