निकृष्ट भ्रमणभाष देणार्या संबंधितांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे ! तुटपुंज्या वेतनावर काम करणार्या अंगणवाडी सेविकांना भ्रमणभाष दुरुस्तीसाठी व्यय करावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे ! – संपादक

वर्धा – अंगणवाडी सेविकांना सरकारने दोन वर्षांपूर्वी भ्रमणभाष दिले होते; मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याने गरम होणे, बंद पडणे यांसह अन्य समस्या येत आहेत. कामात खोळंबा होऊ नये; म्हणून दुरुस्तीसाठी नेले असतांना त्यांचा व्यय या सेविकांना मिळणार्या वेतनाइतका आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांना हा आर्थिक भुर्दंड सहन करणे अशक्य आहे. तरी शासनाने चांगल्या दर्जाचे भ्रमणभाष द्यावेत, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी संघटना, तसेच ‘आयटक’ संघटनेच्या वतीने वर्ध्यातील ६०० अंगणवाडी सेविकांनी त्यांचे भ्रमणभाष प्रकल्प अधिकार्यांना परत केले.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !