सातारा, १८ जून (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात १६ जूनपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नाले, ओढे, नद्या तुडूंब भरून वहात आहेत. सातारा शहराला पाण्याचा पुरवठा करणारा कास तलाव २ दिवसांच्या पावसानेच तुडूंब भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. शहराची लोकसंख्या पहाता भविष्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी गत ३ वर्षांपासून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम चालू आहे. या वर्षीही काम पूर्ण न झाल्यामुळे पाणीसाठा आणि साठवण क्षमता तेवढीच रहाणार आहे. प्रतिवर्षी जुलैमध्ये भरणारा तलाव या वर्षी जूनमध्येच भरला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला !
सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला !
नूतन लेख
- Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
- ‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी
- समीर वानखेडे प्रकरणी चौकशीतून काय निष्पन्न झाले ? – मुंबई उच्च न्यायालयाची एन्.सी.बी.ला विचारणा
- महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !
- महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…