जनतेला शिस्त नसल्याचा हा परिणाम !

मुंबई – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून दंड आकारूनही ते तो भरत नसल्याने आता पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन दंड वसूल करणार आहेत. ४०० कोटी रुपयांचा दंड थकला असून तो वसूल करण्याची मोहीम १४ जूनपासून हाती घेण्यात येणार आहे.
१. प्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेले वाहन मालकांचे तपशील अपुरे असल्याने ई चलन जारी झाले, तरी त्याची बजावणी होत नाही. त्यामुळे ई चलनांचा धाक निर्माण होऊ शकलेला नाही.
२. या सर्वांचा परिणाम दंड भरण्याकडे वाहन मालक दुर्लक्ष करतात किंवा ई चलन प्राप्त झाले तरी ते गांभीर्याने घेत नाहीत.
३. वाहतूक पोलिसांनी एक कॉल सेंटर चालू करून दंड थकवणार्यांना संपर्क केला. त्यांना शिल्लक रक्कम किती, ती कशी भरावी, न भरल्यास काय परिणाम होतील, याची माहिती देण्यात येत आहे. गेल्या ३ मासांत या कॉल सेंटरने १४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे आता उर्वरित ४०० कोटी रुपयांच्या दंड वसुलीसाठी घरोघरी भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन