
सोलापूर – शहरातील किराणा, भाजी, फळे, मांस विक्रीची दुकाने १५ मेपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू असणार आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. उर्वरित सर्व दुकाने १ जूनपर्यंत बंद असणार आहेत, तसेच सोलापूर महापालिका हद्दीत प्रवेश करणार्या प्रवाशांना मागील ४८ घंट्यांपूर्वी केलेला ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल दाखवणे बंधनकारक असणार आहे.
मालवाहतूक करणार्या वाहनांविषयी एकाच वेळी वाहनांमध्ये दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवास करता येणार नाही. ही वाहने राज्याबाहेरील असल्यास त्यांनी राज्यात प्रवेश करण्यापूर्वी ४८ घंटे आधी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र ७ दिवसांसाठी वैध असणार आहे.
‘नाईट क्लब’ना आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपकाला अनुमती
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एका तरुणाला अटक
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
आजगाव येथे ग्रामस्थांचा उद्रेक : खाण प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण रोखले !
‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’च्या देहूरोड मार्गावर २९ गतीरोधक !