
सोलापूर – शहरातील किराणा, भाजी, फळे, मांस विक्रीची दुकाने १५ मेपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू असणार आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. उर्वरित सर्व दुकाने १ जूनपर्यंत बंद असणार आहेत, तसेच सोलापूर महापालिका हद्दीत प्रवेश करणार्या प्रवाशांना मागील ४८ घंट्यांपूर्वी केलेला ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल दाखवणे बंधनकारक असणार आहे.
मालवाहतूक करणार्या वाहनांविषयी एकाच वेळी वाहनांमध्ये दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवास करता येणार नाही. ही वाहने राज्याबाहेरील असल्यास त्यांनी राज्यात प्रवेश करण्यापूर्वी ४८ घंटे आधी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र ७ दिवसांसाठी वैध असणार आहे.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस