कोल्हापूर, १३ एप्रिल (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन ३ सहस्र ९३३ लोकांची शिवभोजन योजनेद्वारे क्षुधातृप्ती करण्यात येत आहे. केवळ ५ रुपयांत देण्यात येणारे हे भोजन कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘पार्सल’ सेवेद्वारे पुरवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३७ ठिकाणी हे भोजन वितरित करण्यात येते. ग्राहकांना हे भोजन ५ रुपयांत पडत असले, तरी प्रत्येक शिवभोजनामागे केंद्र चालवणार्यास सरकार ४५ रुपये देते. त्यामुळे याचा मोठा भार सरकार उचलते. गतवर्षी २६ जानेवारी २०२० या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा प्रारंभ केला होता. प्रारंभी ही योजना केवळ १० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत होती. याचा लाभ प्रामुख्याने गरीब, कष्टकरी, मजूर, हमाल, बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी यांना झाला होता. यानंतर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदीत लोकांना दिलासा मिळावा; म्हणून एप्रिल २०२० पासून ही योजना केवळ ५ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ५ रुपयांच्या तुलनेत याची गुणवत्ताही चांगली असल्याने याचा लाभ लाखो लाभार्थी घेत आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > गरीब, कष्टकरी अशा ४ सहस्र लोकांना प्रत्येक दिवशी शिवभोजनाचा आधार !
गरीब, कष्टकरी अशा ४ सहस्र लोकांना प्रत्येक दिवशी शिवभोजनाचा आधार !
नूतन लेख
- महानगरपालिकेचे कंत्राटदार विशाल माखीजा यांच्यावर आक्रमण
- नावापुरत्या संशोधनाने काहीही साध्य होत नाही ! – डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
- श्रीमंत छत्रपती शाहू यांनी ३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे केले घोषित !
- सांगली, कोल्हापूर येथे अवेळी पाऊस !
- मुंबईत भ्रमणभाष चोरणार्या दोन सराईत चोरांना अटक !
- रांजणगाव (पुणे) येथे घरफोड्या करणार्या २ धर्मांधांना अटक !