
नवी देहली – जादूटोणा, अंधश्रद्धा, आमीष आणि आर्थिक लाभ यांच्या आधारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आदेश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने याचिकाकर्ते अधिवक्ता अश्विनीकुमार उपाध्याय यांना केंद्र सरकारकडे म्हणणे मांडण्यास सांगितले. न्यायालयाने म्हटले की, १८ वर्षांवरील व्यक्ती तिला हवा तो धर्म स्वीकारू शकत नाही, असे कोणतेही कारण दिसत नाही.
या याचिकेत म्हटले होते की, बलपूर्वक धर्मांतर करणे घटनेच्या कलम १४,२१ आणि १५ नुसार चुकीचे असून राज्यघटनेच्या मूळ धर्मनिरपेक्ष सिद्धांतांच्याही विरोधात आहे. केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवला पाहिजे. लोकसंख्येचा स्फोट आणि फसवणुकीद्वारे धर्मांतर यांमुळे ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथे हिंदू अल्पसंख्य झाले असून दिवसेंदिवस त्यांची स्थिती वाईट होत चालली आहे.
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !