नवी देहली – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकला धडा शिकवण्याची सिद्धता केल्यानंतर घाबरलेल्या पाकने क्षेपणास्त्रांची चाचणी घेणे चालू केले आहे. पाकिस्तानने २५ एप्रिल या दिवशी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कराची किनार्याजवळ भूमीवरून भूमीवर मारा करणार्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना प्रसारित केली. भारतातील संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानी नौदलाने हा सराव चालू केला आहे. पाकिस्तानने हवाई संरक्षण सतर्क केले आहे.
Startled by India’s decisive move, Pakistan initiates missile tests! 🚀
Pakistan must understand that no matter how many tests it carries out, it will not bring them any real advantage
🇮🇳 Meanwhile, the Indian Navy successfully conducted a missile test from the warship INS… pic.twitter.com/UYjpM8x8Wg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2025
भारतीय नौदलाने आयएन्एस सुरत युद्धनौकेवरून केली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
पाक एकीकडे क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याच्या सिद्धतेत असतांना भारताने त्यापूर्वीच त्याला चेतावणी देण्यासाठी २४ एप्रिलला क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
भारतीय नौदलाच्या नवीनतम स्वदेशी बनावटीच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक ‘आय.एन्.एस्. (इंडियन नेव्हल शिप) सुरत’ने अरबी समुद्रात अचूकतेसह लक्ष्यावर यशस्वी चाचणी घेतली. ही क्षेपणास्त्र चाचणी संरक्षण क्षमता भक्कम करण्यासाठी एक मैलाचा दगड ठरली आहे.
संपादकीय भूमिकापाकने कितीही चाचण्या केल्या, तरी त्याचा काही लाभ होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे ! |