
नवी मुंबई – काश्मीरमधील पर्यटकांवरील आक्रमण हे आपल्या देशावरील आक्रमण आहे. आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याला ‘जशास तसे’ उत्तर देतील. ते पाकव्याप्त काश्मीर भारतात घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे व्यक्त केला. येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार शरद सोनवणे, उपनेते विजय चौगुले, विजय नहाटा, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
◻️LIVE | 🗓️ 22-04-2025 📍नवी मुंबई 📹 पत्रकारांशी संवाद
https://t.co/UZq2R6Cj1G— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 22, 2025
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की,
१. काश्मीरमधील पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या आहेत. हे नामर्दांचे भ्याड आक्रमण आहे. हा खेळ पाकड्यांनी चालू केला असला, तरी याचा शेवट भारतीय सैन्य करणार आहे.
“PM Modi is in action mode — Surgical Strike 3 prep is underway,” says Maharashtra Dy CM Eknath Shinde.
He demands a total freeze on Pakistan ties:
❌ No films
❌ No cricket
❌ No relations#PahalgamTerrroristAttack#GlobalTerrorist pic.twitter.com/jleWvSiQXU— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2025
२. वर्ष २०१४ नंतर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी डोके वर काढले आहे. पाकिस्तानची नांगी ठेचल्याविना भारतीय सैन्य शांत बसणार नाही. आतंकवाद्यांना पाकिस्तानमध्ये घुसून मारले जाईल.