बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शक्यता

कोलकाता (बंगाल) – राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली आहे. बंगालची सुरक्षा करणे माझे दायित्व आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यघटनेचे पालन करावेच लागणार आहे. भाजपाध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांच्या वाहनताफ्यवार झालेल्या आक्रमणाविषयी ममता बॅनर्जी यांनी क्षमा मागायला हवी.
West Bengal Guv Jagdeep Dhankhar asks Mamata to apologize for ‘Chaddha, Nadda, Fadda, Bhaddha’ comment@prema_rajaram reports https://t.co/7lkgfic216
— Free Press Journal (@fpjindia) December 11, 2020
मानवाधिकार दिनाच्या दिवशी मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात आले. हे आक्रमण लोकशाहीवरील डाग आहे. लोकशाहीत सर्वांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी व्यक्त केली आहे. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा अहवाल केंद्र सरकारने राज्यपालांकडून मागवल्यानंतर सरकारने तातडीने बंगालचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांना देहली येथे बोलवून घेतले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.
दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप नेत्यांच्या ताफ्यावर झालेल्या आक्रमणाच्या घटनेवार ‘हे सर्व नाटक आहे’, असे म्हटले आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !