
नवी देहली – देशभरात दळणवळण बंदी केल्यामुळे सध्या विविध राज्यांतील परप्रांतीय कामगार स्वतःच्या मूळ गावी परत जात आहेत. अशा स्थलांतरित कामगारांद्वारे कोरोनाचे संभाव्य सामुदायिक संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व जिल्हे आणि राज्ये यांच्या सीमा बंद (सील) करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला. ‘या आदेशाचा भंग करणार्यांना १४ दिवस विलगीकरणात काढावे लागतील’, अशी चेतावणीही सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा आणि केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालक यांच्या समवेत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या बैठकीत हा आदेश दिला.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत