नवी देहली – देशभरात दळणवळण बंदी केल्यामुळे सध्या विविध राज्यांतील परप्रांतीय कामगार स्वतःच्या मूळ गावी परत जात आहेत. अशा स्थलांतरित कामगारांद्वारे कोरोनाचे संभाव्य सामुदायिक संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व जिल्हे आणि राज्ये यांच्या सीमा बंद (सील) करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला. ‘या आदेशाचा भंग करणार्यांना १४ दिवस विलगीकरणात काढावे लागतील’, अशी चेतावणीही सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा आणि केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालक यांच्या समवेत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या बैठकीत हा आदेश दिला.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हे आणि राज्ये यांच्या सीमा बंद करा ! – केंद्र सरकारचा आदेश
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हे आणि राज्ये यांच्या सीमा बंद करा ! – केंद्र सरकारचा आदेश
नूतन लेख
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत ॲप’वर अर्ज करता येणार ! – अदिती तटकरे, महिला आणि बालविकास, मंत्री
राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’त दलालांकडून महिलांची आर्थिक लूट !
मेरठ (उत्तरप्रदेश) येथे महंमद इस्लाम नावाची व्यक्ती आंब्यांवर लघवी करून ते विकत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ प्रसारित
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांच्या कपाळावर स्वागत म्हणून टिळा लावल्याने मुसलमान पालक संतप्त !
हाथरस (उत्तरप्रदेश) येथील सत्संगानंतर चेंगराचेंगरी : १२० हून अधिक जणांचा मृत्यू
तालिबान सरकारला मान्यता नाही ! – संयुक्त राष्ट्रे