कोरोनावरील लस लवकर येऊ दे, संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे !
कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
नागरिक विकास मंचच्या सतीश साखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना निवेदन पाठवून एक सेल्फी सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा. या रस्त्याच्या पाहणीसाठी दौरा करा’, असे आवाहन केले आहे.
राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीचा कोल्हापूरलाही लाभ होणार असून २३ मजली इमारतीला अनुमती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्यावसायिक आस्थापने, तसेच सार्वजनिक ठिकाणी केले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी कोरोना संबंधीच्या उपाययोजना केल्या जात नाहीत किंवा कोरोना संबंधीच्या आदेशाचे पालन होत नाही, त्या आस्थापनांना एक लेखी सूचना देऊन ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी चेतावणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने १८००-२३३-१९१३ या ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा चालू केली असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर यात्रा होणार नसली, तरी शहर आणि परिसर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा चालू केल्या आहेत. दोन दिवसांत एकूण ३६६ शाळा चालू झाल्या आहेत. २३ नोव्हेंबर या दिवशी ९ सहस्र ४३५ विद्यार्थी उपस्थित होते, तर २४ नोव्हेंबर या दिवशी ३ सहस्र १५९ विद्यार्थी उपस्थित होते.
दिवाळीमुळे खरेदी साठी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि हिवाळा यांमुळे कोरोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २४ नोव्हेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यात एकूण ८३७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ४१६ जणांचा समावेश आहे.
सर्वांसाठी लोकल सेवा चालू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतरच घेतला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. ‘टीव्ही-९ मराठी’ या वृत्तवाहिनीबरोबर साधलेल्या विशेष संवादाच्या वेळी ते बोलत होते.