(म्हणे) ‘केरळमध्ये चर्चवर आक्रमण करणार्‍यांमागे विशिष्ट विचारधारा !’ – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

केरळमध्ये ३२ सहस्रांहून अधिक मुलींचे आयुष्य लव्ह जिहादने उद्ध्वस्त होते, तेव्हा त्यामागची ‘विशिष्ट विचारधारा’ पवार यांना दिसत नाही, हे लक्षात घ्या !

(म्‍हणे) ‘आपण पुन्‍हा देशाला काही वर्षे मागे नेतो का ?, अशी चिंता वाटते !’ – शरद पवार

संसद भवनाच्‍या स्‍थळी हिंदु धर्मानुसार शास्‍त्रोक्‍त पूजन झाले. हे पवार यांना खटकल्‍यामुळे ते आता विज्ञानवादाच्‍या गप्‍पा मारत आहेत, हे सूज्ञ नागरिक जाणून आहेत  !

(म्हणे) ‘नगर येथे काही शक्ती धर्माच्या नावाने दंगली करत आहेत !’ – शरद पवार

शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक करून दंगल केली. असे असतांना पवार त्यांचे नेहमीचे ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हा प्रकार काही थांबवत नाहीत !

शरद पवार आणि नैतिकता यांचा संबंध काय ? वसंतदादा पाटील यांचे सरकार कसे गेले ? – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवार हे जर भाजपला नैतिकता शिकवत असतील, तर इतिहासात जावे लागेल. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे सरकार कसे गेले ?, येथून प्रारंभ होईल.

भारतीय जनता पक्षाला पर्याय देण्याच्या प्रयत्नात माझाही सहभाग असेल ! – शरद पवार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट होत असतांना मी बाजूला होणे योग्य नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

(म्हणे) ‘निवडणुकीत धार्मिक प्रश्नाच्या आधारे वातावरण निर्माण करणे अयोग्य !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत अध्यक्षपदी रहाणार ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा विचार आताच करता येणार नाही. पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी मी निवृत्ती मागे घेतली. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत मीच अध्यक्षपदी रहाणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

प्रसारमाध्यमांनी राष्ट्रहित जपावे !   

जसाजसा काळ पुढे चालला आहे, तसा या वाहिन्यांमधील परिपक्वपणा, समंजसपणा वाढण्याच्या ऐवजी बालिशपणा, बाजारू वृत्ती, उथळ बातम्या देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अंतर्मुख होऊन कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायला हवे ? याचा विचार करावा !

देहलीचा नेता आणि गल्लीचे राजकारण !

मागील काही दिवस महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ‘लोक माझे सांगाती’ या स्वत:च्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

पक्षांतर्गत बंडाळीची चिन्हे शमवण्यासाठी शरद पवार यांनी केलेले नाटक होते ! – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

शरद पवार यांनी त्यांच्या त्यागपत्राचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर संजय शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकाराला ‘राष्ट्रवादी नाट्य’ संबोधले आहे.