शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावरील माहिती आवेदनात ‘ब्राह्मण – ब्राह्मणेतर’ असा उल्लेख

शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावर शालेय विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येते. पूर्वी या माहिती आवेदनात सर्व जातींचा उल्लेख होता; परंतु आता त्या आवेदनात ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मणेतर’ असा उल्लेख आढळला आहे.

शिक्षण खात्याने नाताळची सुटी १ जानेवारीपर्यंत वाढवली

शिक्षण खात्याने शाळांच्या नाताळच्या सुटीच्या कालावधीत पालट केला आहे. शाळांसाठी पूर्वी नाताळची सुटी २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी होती आणि आता १ जानेवारीपर्यंत असणार आहे. शिक्षण खात्याने हा निर्णय घोषित केला आहे.

पुणे येथे इयत्ता आठवीतील मुलीच्या भ्रमणभाषवर येतात अश्‍लील संदेश

मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते.

मनमानी करणार्‍या पुण्यातील खासगी शाळांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांचे आंदोलन !

शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ शिक्षण बंद करणार्‍या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करावी यासाठी १० डिसेंबर या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत पालकांनी आंदोलन केले होते.

चिंचवडमधील एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल विरोधात पालकांचा फलकाद्वारे निषेध !

पालकांनी केवळ निषेध नोंदवून न थांबता मनमानी कारभार करणार्‍या शाळा प्रशासनाला चूक दुरुस्त करायला लावणे अपेक्षित आहे.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची अचानक शाळा पहाणी

सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा चालू आहेत का ?, याची अचानक पहाणी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यात ४०० शाळा चालू, तर ६५४ शाळा अद्यापही बंदच !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून निघण्यासाठी शाळा लवकर चालू होणे अपेक्षित असतांना प्रशासनाने अशा प्रकारे ढिलाई करणे लज्जास्पद आहे.

दळणवळण बंदीनंतर चालू झालेल्या शाळांमध्ये काय शिकवायचे याविषयी शिक्षकांचा गोंधळ !

मुलांना शाळा चालू झाल्यानंतर काय शिकवायचे आणि पहिल्या सत्राचे मूल्यमापन कसे करावे हे शाळांना का विचारावे लागते ? प्रशासनाने हे स्वतःहून का केले नाही ?

कोरोना काळात सर्वाधिक बंद असलेला शालेय बसव्यवसाय आर्थिक संकटात

कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे राज्यातील ५२ सहस्रांहून अधिक शालेय बसगाड्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे मालक, चालक आणि साहाय्यक यांसहित दीड लाख लोक आर्थिक संकटात सापडले आहेत.

शाळांना अनुदान देण्यापूर्वी होणार्‍या पडताळणीसाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे पथक कार्यान्वित

मूल्यांकनात पात्र ठरलेल्या खासगी शाळांना अनुदान पात्र घोषित करणे आणि २० टक्के अनुदानाने चालू असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देणे, असा निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर मधील बैठकीत घेतला आहे.