पुणे – कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे राज्यातील ५२ सहस्रांहून अधिक शालेय बसगाड्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे मालक, चालक आणि साहाय्यक यांसहित दीड लाख लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात सर्वाधिक बंद असलेला हा एकमेव व्यवसाय आहे. व्यवसाय ठप्प असल्याने गेल्या ७ मासांपासून वेतनही मिळालेले नाही. तसेच शाळा चालू झाल्यानंतर शालेय बसगाड्यांची क्षमताही अल्प होण्याची शक्यता असल्याने बस भाड्यात होणार्या वाढीचा भुर्दंड पालकांनाच सोसावा लागणार आहे. परत बस सेवा चालू करण्यासाठी देखभाल आणि दुरुस्ती यांवरही मोठा व्यय करावा लागेल. त्यामुळे व्यावसायिक धास्तावले आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > कोरोना काळात सर्वाधिक बंद असलेला शालेय बसव्यवसाय आर्थिक संकटात
कोरोना काळात सर्वाधिक बंद असलेला शालेय बसव्यवसाय आर्थिक संकटात
नूतन लेख
- वारसा कर आणि संपत्तीचे समान वाटप अन्यायकारकच !
- कर्करोगाशी लढणार्या पुणे येथील ‘दिव्यांश’ची कहाणी ‘ब्लेझ : एका पुत्राची अग्नीपरीक्षा’ या पुस्तकाने प्रकाशित !
- नेहा हिरेमठच्या मारेकर्याला फाशी झाली पाहिजे !
- केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; मात्र मोठे निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अप्रसन्न !
- श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा !
- ‘डिपफेक’ विरोधात पोलिसांकडे त्वरित तक्रार करा ! – महाराष्ट्र पोलीस