पुणे – कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे राज्यातील ५२ सहस्रांहून अधिक शालेय बसगाड्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे मालक, चालक आणि साहाय्यक यांसहित दीड लाख लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात सर्वाधिक बंद असलेला हा एकमेव व्यवसाय आहे. व्यवसाय ठप्प असल्याने गेल्या ७ मासांपासून वेतनही मिळालेले नाही. तसेच शाळा चालू झाल्यानंतर शालेय बसगाड्यांची क्षमताही अल्प होण्याची शक्यता असल्याने बस भाड्यात होणार्या वाढीचा भुर्दंड पालकांनाच सोसावा लागणार आहे. परत बस सेवा चालू करण्यासाठी देखभाल आणि दुरुस्ती यांवरही मोठा व्यय करावा लागेल. त्यामुळे व्यावसायिक धास्तावले आहेत.

जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)